नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनची स्मार्टफोन निर्माता कंपननी शाओमीवर (Xiaomi) अंमलबजावणी संचालनालय अर्था ईडीने (Enforcement Directorate) मोठी कारवाई केली आहे. ईडीने फेमा अंतर्गत शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची (Xiaomi India) तब्बल ५,५५१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्यानुसार, Xiaomi ने 2014 मध्ये भारतात आपली सेवा सुरू केली होती. त्यासाठी 2015 पासून पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात झाली होती. कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपासाच्या आधारे ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे विदेशी चलन तीन परदेशी-आधारित संस्थांना पाठवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये Xiaomi ग्रुपचे एक युनिट देखील समाविष्ट आहे.
यानंतर, त्यांना 5,5513 कोटी रुपये पाठवले. ईडीने आरोप केला, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस आधारित असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे.