TheClearNews.Com
Thursday, December 4, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन दोन दिवसांत चीनी सैन्याची माघार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनच्या पीएलएने नियोजनबद्धरित्या भारतीय सैन्यावर हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा यावेळी प्रत्युत्तर देत चीनला वठणीवर आले. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ सैन्य पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही कुठलाही तोडगा निघू शकला नव्हता. तर आता चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

मागच्यावर्षी मे महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख सीमेवर अतिक्रमण केल्यानंतर भारत-चीनमध्ये सीमा वादाला सुरुवात झाली. परस्परांने इशारे, शाब्दीक बाचाबाची आणि धक्काबुक्की असे सुरुवातीला या वादाचे स्वरुप होते. पण १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनने आपला खरा विश्वासघातकी चेहरा दाखवला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे परिस्थिती चिघळली आणि वाद आणखी विकोपाला गेला. लडाख वरील वास्तविक नियंत्रण रेषेवर गेल्या नऊ महिन्यांपासून भारत – चीनचं सैन्य एकमेकांच्या समोर उभं होतं. दोन देशांमधील तणाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनी सैन्य अत्यंत वेगानं LAC वरुन मागं सरकत आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सहमतीनुसार चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात चीननं या भागातून २०० रणगाडे हटवले आहे.

READ ALSO

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

‘पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे,’ अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत दिली होती. या चर्चेमध्ये भारतानं काहीही गमावलं नसल्याचं त्यांनी सांगितले होते. चीनबरोबर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देश नियोजनबद्ध पद्धीतीनं आणि परस्परातील समन्वयातून या भागातील सैन्य मागं घेतील, असं सिंह यांनी स्पष्ट केलं होतं. भारत आणि चीन यांच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावानंतर हे यश मिळालं आहे. मात्र पूर्व लडाख परिसरातील सैन्याच्या टेहाळणीबाबत अजूनही काही मुद्दे प्रलंबित असून त्यावर दोन्ही देशांमध्ये यापुढेही चर्चा सुरु राहणार आहे.

भारतीय लष्करानं एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये पँगाँग तलावाच्या परिसरातून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे तीन रणगाडे आणि भारतीय सैन्याचा एक रणगाडा माघारी फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीचं संक्षिप्त फुटेज देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रणगाडे तसंच सैन्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य मागं घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. आता उत्तर किनाऱ्यावरील सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी व्हावा यासाठी सप्टेंबर २०२० पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर पहिल्यांदाच सैन्य मागं घेण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

“भारताने सुद्धा आपली शस्त्रसज्ज वाहने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. पण चीनचा स्वभाव लक्षात घेता, परिस्थिती बिघडली तर प्रत्युत्तर देण्याची योजना देखील तयार आहे” असे नरेंद्र मोदी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जगातील सर्वात मोठे लष्कर, सैन्य शक्ती आणि महासत्ता असल्याचे चीन दाखवतो. पण चीनला त्याच्या कुठल्याही उद्दिष्टामध्ये यशस्वी होऊ न देता पुन्हा कायमस्वरुपी तळावर पाठवून देण्यात भारत यशस्वी ठरला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
Next Post

सीडी लावण्याचे काम अजून बाकी ; खडसेंचा पुन्हा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी मोदी आणि उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतरच मी घेईन : प्रकाश आंबेडकर

January 16, 2021

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

July 12, 2023

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश : राजेश टोपे

December 17, 2020

गुंतवणुकीतून अधिकच्या नफ्याचे आमिष ; शेतकऱ्याची तब्बल साडेपाच लाखांत फसवणूक ! !

September 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group