चोपडा (प्रतिनिधी) मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामठी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण ठार तर ६ जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमी आणि मयत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.
आंबा अवतार येथे कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअप गार्डने वैजापूरहून मुलं जात असताना अवघ्या काही अंतरावर जामठी गावाजवळ हा अपघात झाला. गाडी तीन वेळेस पलटी झाल्यामुळे निलेश शांतीवाल बारेला, जगदिश बारेला हे जागीच ठार झाले तर एका जळगाव घेवून जात असतांना एकाची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. या अपघात एकूण तीन जण मयत झाले आहेत. तर दोन जबर जखमी आहेत. त्यातील राहुल संजय बारेला याला जळगाव येथील न्युकलेस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तर विवेक बारेला याला गोदावरी टॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले आहे. तर परशुराम नाश्या बारेला, दिलिप बारेला राहूल सरदार बारेला हया तिघांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार आहे.