पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील ग्रामपंचायत मार्फत सर्व नागरीकांना सूचना करण्यात येत आहे. गावात डेंगु लागण झालेबाबत ऐक केस आरोग्य विभागास निदर्शनास आली आहे. तरी याबाबत ग्रामपंचायत ने खबरदारी घेतली असुन नागरीकांनी ऐक आठवडेपेक्षा जास्त दीवस पाणी साचउन ठेउ नये. असे ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल यांनी सूचना केले आहेत
तसेच गरजेपुरताच पाणी साठा करावा. व आठवडेतुन ऐक दीवस कोरडा दीवस पाळावा. त्या दीवशी सर्व पाण्याचे भांडी रीकामी करुन कोरडी ठेवावीत. आपले सांडपाणी शौच खड्डे करुन त्यात सोडावे. आपले घरासमोरील गटारीचे पाणी वाहते करावे. डबके आसल्यास ते वाहते करावे. परीसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतीमार्फत फाँगीग करण्यात येणार असुन नागरीकांनी आवश्कय ठीकाणी फाँगींग करुन घ्यावे. घरांचे बांधकाम करतांना गटारीपासुन पाच फुट मागे करावे. बांधकाम साहीत्य गटारीजवळ न टाकता बाजुला टाकावे. गुरे गटारीजवळ न बांधता दुर बाःधावेत. उकीरडे टाकु नयेत. नागरीकांनी ग्रामपंचायत कराच्या थकबाक्य भराव्यात. जेणेकरुन सुविधा देणे शक्य होईल. नागरीकांना काही समस्या असल्यास ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल याना फोन करून समस्या निवारण करू शकता. ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. आपल्या समस्या आधिकारी, शिपाई, क्लर्क, गटार कामगार, पाणी पुरवठा कर्मचारी यांना वेळो वेळी सांगत चला तसेच ग्रामपंचायत कार्यलय मध्ये येत असतांना माक्स लावून या माक्स लावला नसेल दंड आकरला जाईल असे पातोंडा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बि. वाय. पाटिल यांनी सूचना दिल्या आहेत.