रावेर (वृत्तसंस्था) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. सदर भागात निंभोरासिम, विटवा, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, निंबोल, सुलवाडी, अहिरवाडी व कोळोदा या गावांमध्ये शेती व घरांची पाऊस व जोरदार वादळामुळे झालेल्या नुकसानीची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे सांत्वन केले. तसेच झालेल्या नुकसानीचे तहसीलदार रावेर यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषि मंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्रव्यवहार करून आपआपल्या स्तरावरून स्थानिक प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या पंचानाम्यावर तत्काळ कार्यवाही करून आधीच कोरोना सारख्या महामारीचा सामना करीत असलेल्या शेतकरी व नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता त्यांना मोठा दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विमा रक्कम व कच्च्याघरांचे नुकसान झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन मधून येत्या १० ते १५ दिवसात मदत मिळण्यासाठी विनंती केली.
तसेच पंचायत समिती रावेर येथे जिल्हा कृषि अधिकारी, ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बठक घेऊन त्यांच्या स्तरावर तत्काळ शेती नुकसानीचा मोबदला मिळणे बाबत कार्यवाही होणेस सांगितले असता जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडून तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन मिळाले.
यावेळी नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प.स.सभापती जितेंद्र पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजयुमो रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, प्रल्हाद पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, सिंगत सरपंच प्रमोद चौधरी, भूषण पाटील वाघाडी, के ओ महाजन, चंद्रकांत विचवे, यांच्यासह रावेर तहसिलदार देवगुने, सहाय्यक गट विकास अधिकारी डी.एच.पाटील, कृषि अधिकारी भामरे, मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी भाग्यश्री परवे, तलाठी किर्ती कदम, तलाठी शिरसाठ इ. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.