धरणगाव प्रतिनिधी । गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तालुक्यात अवकाळी अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, मका, कापुस, सोयाबीन, मुंग व उडीद इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बंधु फार मोठ्या संकटात सापडला आहे. सर्व पिके कवडीमोल झालेले आहेत. तरी शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन धरणगाव तालुका ओला दुष्काळी जाहिर करावा, शासनाने संकटात सापडलेला शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले.
त्या प्रसंगी भाजपचे नेते शिरीष आप्पा बयस, अँड.संजय महाजन, पुनिलाल आप्पा महाजन, शेखर पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, मधुकर रोकड़े,जेष्ठ नगरसेवक शरदअण्णा धनगर,ललित येवले, सुनिल चौधरी, राजू महाजन, कन्हैया रायपुरकर, टोनी महाजन, शरद भोई, सचिन पाटील, शुभम चौधरी, विक्की महाजन, समाधान पाटील, विकास चव्हाण, प्रदिप महाजन इत्यादी भारतीय जनता पार्टिचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते