नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ४ लाखांवर गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता १० हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात देशाच्या रुग्णासंख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ८० हजार ८३४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ३०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,९४,३९,९८९ झाली असून, आजपर्यंत २,८०,४३,४४६ रूग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. तर, देशभरात आजपर्यंत ३,७०,३८४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या १०,२६,१५९ आहे.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत २५,३१,९५,०४८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १२ जून पर्यंत ३७,८१,३२,४७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १९,००,३१२ नमुन्यांची काल तपासणी झालेली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शनिवारी १०,६९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४,९१० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ३६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, काल ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती.