नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या ७२ दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ३ हजार ९२१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्या अद्याप कमी झालेली नाही. अशातही काल दिवसभरात ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७० हजार ४२१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून,१ लाख १९ हजार ५०१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३ हजार ९२१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशात सलग सातव्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ७०,४२१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आणि ३९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, आठवड्याच्या शेवटी ५३,००१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी ३० मार्च रोजी ५३,४८० रुग्णांची नोंद झाली होती.
देशात सलग ३२ व्या दिवशी कोरोना व्हायरसचे नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. १३ जनपर्यंत देशभरात २५ कोटी ४८ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १४ लाख ९९ हजार लसीचे डोसे देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास ३८ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १४.९२ लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून अधिक आहे.
राज्यातली स्थिती
राज्यात काल १०,४४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ७,५०४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल ४८३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण १,५५,५८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील १५ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर १३ ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण ५६,३९,२७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.