भुसावळ (प्रतिनिधी) पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे भाजपचा पराभव झाला. एवढेच नव्हे तर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, अशा शब्दात एकनाथराव खडसेंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
खडसे पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धूर चारली. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे. तर महाविकास आघाडीवर विश्वास आणखी दृढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला एकीचं फळ मिळालं आहे. भाजपमध्ये हम करे सो कायदा होता म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याची खोचक टीका खडसेंनी दिली आहे. चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणत की, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही. आम्ही हिमालयात जाऊन बसू, त्यांच्या नुसत्या गप्पा असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.
बीएचआरच्या ठेविदारांच्या पैश्यांचे वाटप ताबडतोब सुरू करणे हि राज्य सरकारने व केंद्र शासनाची संयूक्त जबाबदारी आहे.
ठेविदारांनी ज्या संस्थेत पैसे ठेवले त्या संस्थेला दोन्ही सरकारच्या मान्यता होत्या.
ठेविदारांना पैसे देता यावेत म्हणून राज्य सरकारने स्थानिक राज्यकर्त्यांच्या मदतीने केंद्राच्या निर्देशनानुसार केलेल्या नियुक्त अवसायकाने भ्रष्टाचार करून ठेविदारांना आगीतुन फोफाट्यात लोटले ह्या घटनेला ही पूर्ण सरकारी यंत्रणा जबाबदार आहेत.
ठेविदारांंना न्याय देण्याऐवजी राजकीय षडयंत्र करणार्या घटनेमागे अनेकांचे वैयक्तिक हेवेदावे असल्याचे स्पष्ट आहे.
बीएचआर बंद होऊन गेली सहा वर्षे ठेविदारांनी अनंत यातना भोगल्या आहेत . आता फक्त ठेविदारांचे पैसे देण्यासाठी दोन्ही सरकारांनी सुरूवात करावी ह्या व्यतिरिक्त दूसरे कोणतेही मार्ग नको. किरण दीक्षित,पुणे.मोबा.७२७६०५०१५१,