चाळीसगाव (प्रतिनिधी) मेहुणबारे-दहिवद भागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले आहे. ते मेहुणबारे-दहिवद जिल्हा परिषद गटात महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.
महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ मेहुणबारे दहिवद जिल्हा परिषद गटाचा भव्य मेळावा गुरुवारी चिंचगव्हाण फाटा येथे संपन्न झाला. या जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प यावेळी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बोलून दाखवला. तर आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, पांझण डावा कालवा काँक्रीटीकरण निधी मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न सोडविण्यात येईल. तसेच गेली अनेक दशके प्रलंबित धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम मोदी सरकार आल्यानंतर पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी मेहुणबारे येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मिती झाली असून लवकरच ते कार्यान्वित होणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी आपल्या मनोगातून सांगितले.