धरणगाव (प्रतिनिधी) वाळूमाफियांनी धरणगाव तहसीलदारांची गाडीला घेरत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री चैताली जिनिंगजवळ घडली आहे.
यासंदर्भात तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गारखेडा शिवारातील चैताली जिनिंग जवळ रेतीने भरलेला डंपर धरणगाव दिशेने होता. सदर डंपर पकडण्यासाठी मी व खासगी चालक असलम पटेल यांनी गाडी वळवली. परंतू याच वेळी आरोपी महेंद्र मच्छिंद्र पाटील व त्यांचे चार साथीदार हे (एम.एच-२० इजे ९५७०) या क्रमांकाच्या गाडीतून आमचा पाठलाग करताना दिसून आले. सदर गाडी आम्हाला साईड देत नसल्यामुळे वाळूने भरलेला डंपर पळून गेला. त्यानंतर सदर वाहनातील आरोपी महेंद्र मच्छिंद्र पाटील व त्याचे चार साथीदार (रा.बांभोरी प्र.चा) यांनी पी.आर. कॉलेजपर्यंत आमचा पाठलाग केला. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास डंपर रिकामे झाल्यानंतर चैताली जिनिंग जवळ थांबून होते. त्यामुळे आम्ही सदर डंपर चालकाला विचारणा केली असता, तो सरळ अरेरावीवर आला व डंपर मधून खाली उतरत माझ्याशी हुज्जत सुरू करत म्हणाला की, तुम्ही वारंवार आमच्या गाड्या पकडतात. तुमचे खूप झाले आता दाखवतो, असे म्हणत माझ्या खाजगी वाहनाला सदर पाच ते सहा जणांनी साधारण दीड वाजेच्या सुमारास घेरले. तर मच्छिंद्र पाटील याने मला धमकावत बोलला की, तुम्हाला आता दाखवतो म्हणत गाडीच्या काचेतून हात घातला व माझ्या हाताला धक्का दिला. तसेच माझी कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू लगेचच कच बंद केला. त्यानंतर तो पुन्हा म्हणाला की, तुम्ही काच खाली करा मग दाखवतो, असे बोलून मला धक्काबुक्की करण्याचा मनसुब्याने गाडी जवळ उभे राहिला, असे श्री.देवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महेंद्र पाटील व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की करण्याच्या इराद्याने ासकीय अधिकार्यावर धावून जाणे आदी आरोपाखाली भादवि कलम ३५३ अन्वये तसेच महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) ४८ (८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.