नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकच्या हनुमान जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक सुरू होण्याआधीच राड्याला सुरुवात झाली. यावेळी साधूंमध्ये ‘खुर्ची’चा वाद सुरू झाला.
अंजनेरी आहे की किष्किंदा, यावरून हा वाद सुरू झालाय. किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड फुटलं.
गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला होता. दरम्यान त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गाविंदानंद सरस्वती यांना नोटीस बजावली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज शास्त्रार्थ सभेत वादाला आणखी फोडणी मिळाली आहे.
दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक सुरू होण्याआधीच राड्याला सुरुवात झाली. आसन व्यवस्था समसमान करण्यात आली नसल्याने काही साधूंना राग आला. स्वामींची अनिकेत शास्त्री यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, गोविंदानंतद सरस्वती स्वामी वर येऊन बसल्याने अन्य साधूंनी आक्षेप घेतला. यामुळे साधूंमध्ये ‘खुर्ची’चा वाद सुरू झाला. आसनव्यवस्था समसमान करण्याची मागणी होत आहे. गोविंदानंद सरस्वती यांनी खाली बसावं अशी मागणी करण्यात आली आहे. तुम्ही विद्वान असाल, साधू असाल, मात्र आमचा मान राखावा असं नाशिकच्या साधूंनी म्हटलंय.