अमळनेर (प्रतिनिधी) येथील मांडळ गावात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना सोमवारी दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार आज दि. २ सप्टेंबर रोजी दु. १२ वाजता मांडळ येथे सरपंच सौ विद्या विजय पाटील, उपसरपंच हंसराज मोरे, पिंपळे आश्रम शाळेचे माध्यमिकचे मुख्याध्यापक उदय पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक अविनाश अहिरे यांच्या हस्ते अदिवाशी बांधवांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ९१ लाभार्थ्यांना खावटी किटचे वितरण करण्यात आले. किराणा साहित्याची गुणवत्ता तपासल्यावर किट साहित्य बाबत आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विजय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोळी, रोहित पाटील, सुरेश कोळी, पो पा भास्कर पाटील, रावसाहेब कोळी, निंबा बडगुजर, जितेंद्र पाटील, पत्रकार सुरेश कांबळेसह बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. तसेच खावटी वाटपला गंगासागर वानखेडे, नितीन सोनवणे,बी बी वानखेडे, सचिन पाटील, राहुल पाटील यांनी सहकार्य केले.