अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रसेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती व लोकसंघर्ष मोर्चा यांची संयुक्त बैठक नुकतीच कांताई सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे या होत्या. यावेळी जळगाव शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना “गुणवंत शिक्षक” पुरस्काराने शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कांताई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मनोगतात मुंबईत शिक्षकांचा पगार १ तारखेला व राष्ट्रीयकृत बॅंकेत होतो व नारायण वाघ जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रयकृत बॅंकेत पगार होण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आपण मोठ्या संखेने सह्यांची मोहिम राबवून नारायण वाघ यांना सहकार्य करण्याचे आव्हान केले. कार्याध्यक्ष शिक्षक सुभाष मोरे यांनी संघटित होऊनच प्रश्न सुटतात त्यासाठी शिक्षक भारतीत संघटित होण्याचे आव्हान केले, आम्ही व आमदार कपिल पाटील आपले प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहोत व गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्यात. प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, राष्ट्रसेवा दलाचे अशोक पवार, छात्र भारतीचे सचिन बनसोडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला.
करीम सालार, भारती गाला, तसेच संघटनेचे अशपाक खाटिक, नूर खान, भरत शेलार, धुळे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, विनोद रोकडे, लालाजी नांद्रे आदी मान्यवरही उपस्थित होते. मनोगतात कपिल पाटील शिक्षक आमदार यांनी राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती लोक संघर्ष मोर्चा या वैचारिक पुरोगामी विचार सरणीच्या संघटना एकत्र करुन शिक्षकांचे सर्व समस्या कशा सोडवता येतील. यावर वैचारिक प्रकाश टाकला राष्ट्र सेवा दलची निव फैजपुर अधिवेशनात रोवली गेल्याची आठवण त्यांनी करुन दिली. आमदार कपिल पाटील याच्या हस्ते ५६ शिक्षकांना पुस्तक देवून बालभवन देखील सुरु करण्यात आलेत. तमाम शिक्षकांना साने गुरुजी बाल भवन सुरु करुन साने गुरुजींचे विचार मुलांमध्ये रुजवण्याचे आव्हान त्यानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात प्रतिभाताई शिंदे अध्यक्ष लोक संघर्ष मोर्चा यांनी राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती लोक संघर्ष मोर्चा एकत्र करुन शिक्षकांच्या प्रश्नांवर जोरदार संघर्ष करेन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही, अस व्यासपिठवरुन जाहिर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ ब्रिजलाल पाटील जिल्हाध्यक्ष प्राथमिक यांनी तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष नारायण आनंदा वाघ, जिल्हाध्यक्ष माध्यामिक यांनी केले. आर.जे.पाटील कार्याध्यक्ष यांनी माध्यमिक पुरस्कार वाटपाचे सुत्र संचलन केले तर प्राथमिकचे सोमनाथ पाटील, अजयकुमार पाटील यांनी केले, आभार विनोद चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुणवंत शिक्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रचेचे नियोजन प्रभारी अध्यक्षा सुनिता पाटील यांनी केले. प्रभात तडवी कार्यवाह, रणजित पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील, सुनील माळी उपाध्यक्ष, रविंद्र पाटील संपर्क प्रमुख, सुशील पाटील, निलेश इंगळे, किशोर पाटील, विनोद नाईक, पंकज गरूड जळगाव तालुकाध्यक्ष, सुनील बोरसे धरणगाव तालुकाध्यक्ष, प्रविण चौधरी, विलास पाटील, चंद्रकांत देशमुख, विजय सोनवणे, संजय पाटील, विशाल वाघ, आर के पाटील, दीपक आर्डे, संजय वानखेडे, शेखर पाटील, अमोल वाणी, पंकज पाटील इतर सर्व जिल्हा तथा तालुका टीमचे सहकार्य व अशोकभाऊ जैन अध्यक्ष जैन उद्योग समुह जळगाव व विवेक सुर्यवंशी यांचे अनमोल सहकार्य लाभले.