TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा !

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, हर्षल पाटीलने मारली बाजी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या राष्ट्रभक्तीच्या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या भाषणांनी संपूर्ण सभागृहात राष्ट्रभक्तीने जागृत झाले होते. युवावर्गाला जागृत करण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेत पाचोरा येथील हर्षल पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.

जिल्हा प्रशासन आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावच्या माध्यमातून तालुकास्तरावर ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत प्रत्येक तालुक्यात गेल्या आठवड्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अल्पबचत भवनात पार पडली. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे डॉ.उमेश गोगडीया, भुसावळ रेल्वे विद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.कुलकर्णी, केसीईचे प्रा.संदीप केदार, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, माजी युवा स्वयंसेवक चेतन वाणी आदी उपस्थित होते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

प्रस्तावना करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी, नेहरू युवा केंद्राने राबविलेल्या मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छ भारत अभियानाची माहिती दिली. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून १८ ते ३५ वयोगटातील युवावर्गाला सहभागी करून घेतले जात आहे. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम विजयी स्पर्धकाला राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ या विषयाच्या माध्यमातून आपण देशनिर्माण करण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन डागर यांनी केले.

समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढे यावे
देशाच्या लोकसंख्येत युवावर्गाची संख्या सर्वाधिक आहे. देशाच्या जडणघडणीत तरुणांचा मोठा वाटा आहे. युवावर्गाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत देशासाठी वेळ देणे आवश्यक आहे. देशाच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युवा जेवढा पुढे येईल, समाजकार्यात सहभागी होईल तेवढ्या लवकर आपल्याला बदल दिसेल. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत उपक्रमात युवांची एकजूट दिसल्याने त्याचे परिणाम देखील चांगले आले, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

कोरोना काळात तरुणांचे मोठे योगदान
उपजिल्हाधिकारी प्रसाद मते म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेक तरुण पुढे आलेत ज्यांना समाजासाठी काही करायचे होते. युवा जेव्हा आपला मौलिक वेळ देशासाठी द्यायला लागतो तेव्हा खऱ्याअर्थाने देशनिर्माणला सुरुवात होते. आपल्या आजूबाजूला असलेली स्पर्धा आपल्याला समाजकार्य करण्यास प्रेरणा देते. आपण समाजाचं देणं लागतो हे समजल्यावर आपसूकच देशहिताच्या गोष्टी घडतात, असे मते यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी सोमवंशी यांनी केले. आभार नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांनी मानले.

प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक
अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी, अनेक अभियान राबवून देखील गल्लोगल्ली अस्वछता दिसते. एकमेकांवर न ढकलता प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे युवावर्गाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. देशाच्या उभारणीत सामाजिक आणि नवनवीन कार्यक्रमांचा मोठा सहभाग आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्र उभारणीसाठी लाजू नये
डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी, नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेत लाजणारा व्यक्ती चालत नाही. धावणारा, पळणारा आणि प्रचंड उत्साह असलेला युवा त्याठिकाणी असायला हवा. सोशल मिडीयाच्या नादी लागून कुटुंबाचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. थोर पुरुषांनी बलिदान दिले तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी काय योगदान दिले हे माहिती होण्यासाठी ही स्पर्धा आहे. भारताच्या प्रतिज्ञेतील प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावल्यास आपल्याला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

हर्षल पाटील करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या विषयावर त्यांनी भाषण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षल प्रवीण पाटील, पाचोरा, द्वितीय क्रमांक प्रणिता श्रीकांत काबरा, जामनेर, तृतीय क्रमांक सायली गणेश महाजन, भुसावळ यांनी पटकावला. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत हर्षल पाटील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरावर तो विजयी झाल्यास त्याला दि.२६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कार वितरण
जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील प्रथम पुरस्कार तेजस पाटील, द्वितीय पुरस्कार पल्लवी तायडे, तृतीय पुरस्कार मुकेश भालेराव यांना तर उत्कृष्ट गट पुरस्कार बोरसे युवा फाऊंडेशन, मोरार ता.जामनेर यांना जाहीर झाला होता. आजच्या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच कोविड काळात स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या माजी स्वयंसेवक आकाश वाघ याचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन अवचारे, तेजस पाटील, दुर्गेश आंबेकर, शंकर पगारे, हेतल पाटील, नेहा पवार, सागर नाजणे, मनोज पाटील, सुश्मिता भालेराव, कल्पना पाटील, पल्लवी तायडे, आनंदा वाघोदे, मुकेश भालेराव, उमेश पाटील, गौरव वैद्य यांच्यासह सर्व युवा स्वयंसेवकांनी आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

January 11, 2023

बीएचआर घोटाळा : कंडारेचा जामीनसाठी अर्ज ; शिक्रापूर गुन्ह्यात झंवरच्या जामिनवर गुरुवारी निकाल !

October 26, 2021

परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष दाखवत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

April 30, 2022

मोठी बातमी : लाचखोर महावितरणचे सहाय्यक अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group