TheClearNews.Com
Monday, July 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको ; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी !

जाणून घ्या...उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत यावर पक्षाचा निकाल देऊ नये. तर पक्षाची घटना आणि जनमानसातील पक्षाचं स्थान यावर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

पक्ष जर का बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल किंवा पैशांच्या जोरावर फोडणार असेल तर मग लोकशाहीला काय अर्थ राहतो. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर केला तो जर त्यांच्या बाजूने असेल आणि कोर्टाने जर त्यांना अपात्र ठरवलं तर काय करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केलं आहे. निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे पक्ष असं ठरवलं तर ते हस्यास्पद ठरेल. तसंच करायचं असेल तर मग निवडणूक आयोगाने इतका वेळ थांबण्याची गरज नाही. उद्या कोणी पैसेवाला किंवा उद्योगपती उठेल आणि निवडणूक न लढवता, पक्ष न स्थापन करता खासदार विकत घेईल आणि पंतप्रधान होईल. असं करणं म्हणजे लोकशाही नाही.
गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे.

READ ALSO

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे !
1) शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

2) लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

3) अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावलं होतं, त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

4) शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे ठाकरे म्हणाले.

5) लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

6) सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

7) शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

8) अपात्रतेचा निर्णय आधी होणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

9) सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

10) निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. तरीही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025
जळगाव

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे

July 4, 2025
जळगाव

निवडणुकांसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी ; प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे उद्या जिल्ह्यात

July 2, 2025
जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
Next Post

शहादा येथे शुक्रवारी सामुदायिक विवाह सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावच्या चित्रा चौक परिसरात एकाचा खून, दोन जखमी !

December 20, 2022

गीता नगरात तीन लाखांची घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 6, 2021

भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील; किरीट सोमय्या यांचं खुलं आव्हान

December 19, 2020

सहाय्यक आयुक्त गणेश चाटेंवर कठोर कारवाईची मागणी, जळगावात पत्रकारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

December 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group