TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको ; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी !

जाणून घ्या...उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत यावर पक्षाचा निकाल देऊ नये. तर पक्षाची घटना आणि जनमानसातील पक्षाचं स्थान यावर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

पक्ष जर का बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल किंवा पैशांच्या जोरावर फोडणार असेल तर मग लोकशाहीला काय अर्थ राहतो. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर केला तो जर त्यांच्या बाजूने असेल आणि कोर्टाने जर त्यांना अपात्र ठरवलं तर काय करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केलं आहे. निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे पक्ष असं ठरवलं तर ते हस्यास्पद ठरेल. तसंच करायचं असेल तर मग निवडणूक आयोगाने इतका वेळ थांबण्याची गरज नाही. उद्या कोणी पैसेवाला किंवा उद्योगपती उठेल आणि निवडणूक न लढवता, पक्ष न स्थापन करता खासदार विकत घेईल आणि पंतप्रधान होईल. असं करणं म्हणजे लोकशाही नाही.
गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे !
1) शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

2) लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

3) अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावलं होतं, त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

4) शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे ठाकरे म्हणाले.

5) लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

6) सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

7) शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

8) अपात्रतेचा निर्णय आधी होणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

9) सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

10) निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. तरीही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

शहादा येथे शुक्रवारी सामुदायिक विवाह सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्न मोडण्यासाठी तरुणीचे छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी ; सायबर पोलिसात गुन्हा

January 20, 2022

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आणि एक पात्री नृत्य स्पर्धा उत्साहात !

August 29, 2023

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

October 4, 2023

त्रिपुरा सरकारचा निषेध करीत भुसावळात मुस्लिम बांधवांनी आर्थिक व्यापार पाळला बंद

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group