अहमदनगर (वृत्तसंस्था) मधुमेह असलेली व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांना प्रथम त्यांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पथ्य पाळताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच मुधमेही व्यक्तींनी पथ्य पाळत असताना काही फळांचं सेवन हे कटाक्षाने टाळायचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेहींनी सेवन करू नयेत अशी काही फळे.
फायबरने युक्त फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. परंतु अशी काही फळे देखील आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर केळी, चिकू, आंबा, द्राक्षे, अननस आणि टरबूज ही फळे खाणे टाळा. अशा परिस्थितीत, ते टाळणे महत्वाचे आहे.
द्राक्षे : द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही खूप जास्त असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे २३ ग्रॅम साखर असते, त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वीही शुगरच्या रुग्णांनी विचार करून हे फळ फार कमी प्रमाणात सेवन करावे.
लीची : लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याची गणना जास्त साखर असलेल्या फळांमध्ये केली जाते. त्यामुळे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी लिची न खाल्ल्यास उत्तम.
आंबा : फळांचा राजा आंब्याची विक्री चालू हंगामात वाढली आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते असे तज्ज्ञांचे मत असले तरी त्यांच्या मते १०० ग्रॅम आंब्यामध्ये १४ ग्रॅम साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते.
अननस : ताज्या अननसाचा जीआय ५९ च्या जवळ आहे. त्याच्या अतिसेवनाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. अशावेळी त्याचे सेवन टाळावे. ज्या लोकांना अननसाचा ज्यूस प्यायला आवडतो, अननसाचा ज्यूस फळापेक्षाही घातक ठरू शकतो.
केळी : केळीमध्ये जीवनसत्त्वे ते फायबर आणि पोटॅशियमसह अनेक खनिजे असतात, परंतु केळीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनीही केळी खाणे टाळावे.