जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यास मंडळ, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, बुद्धिष्ट अध्ययन व संशोधन केंद्र, विचारधारा प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कवी संमेलन दिनांक ०६ डिसेंबर दुपारी ०२:०० आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दि. ६ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे उपस्थित राहणार आहेत. तसेच कवी म्हणून विवेक मोरे (मुंबई), वीरा राठोड (चाळीसगाव), संजीवकुमार सोनवणे (जळगाव), देवानंद पवार (औरंगाबाद), शब्बीर शेख (सिल्लोड), हिरामण मोरे (अकोला) उपस्थित राहणार आहेत. प्रास्ताविक विभाग प्रमुख- डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग तथा संचालक- व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा क.ब.चौ. उ.मचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल डोंगरे हे करणार आहेत.
Link:-
https://meet.google.com/hip-edpy-hod