मुंबई वृत्त संस्था | हिमाचल प्रदेशातील कुल्लु येथे धक्कादायक घटना घडली असून भीषण बस अपघात झाला आहे. सोमवारी साईंज घाटात सकाळी बस दरीत कोसळली. बसमध्ये एकूण ४५ लोक प्रवास करत होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये काही शाळकरी मुल होती. ही मुल शाळेसाठी जात होते. बस जात असताना दरीत कोसळली.
ही बस हिमाचल प्रदेश येथील साईंज खोऱ्यातील शेनसार येथून साईंजच्या दिशेने येत होती. यावेळी जंगला नावाच्या ठिकाणी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले, यात ती बस दरीत कोसळली. शाळेच्या दिशेने जाणाऱ्या या बसमध्ये स्थानिक लोकांव्यतिरिक्त शाळकरी मुलेही प्रवास करत होते. बसच्या अपघाताची माहिती मिळाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनास्थळी मदत सुरु आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
सदर घडलेल्या घटनेनंतर विविध स्थरातून शोक व्यक्त करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक प्रकट केला आहे. याअपघातावर मोदी यांनी ट्विट केले आहे. ‘हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील,’ अस ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना मदत कत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.