अमळनेर (प्रतिनिधी) दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मु काश्मीरमधील पूलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशातील ४० सैनिकांना विरमरण पत्करावे लागले. प्राणाची आहुती द्यावी लागली. आपण भारतवासी ही घटना कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह येथे माजी सैनिक संघ व खान्देश रक्षक संस्था अमळनेर यांच्यावतीने विर शहिद अमर जवानांना मानवंदना देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
श्रध्दांजली देण्यासाठी सुबेदार मेजर बळीराम वानखेडे, माजी सैनिक संघ (अध्यक्ष) सुबेदार नारायण पाटील, सुबेदार गणेश पाटील, माजी सैनिक राजेंद्र यादव (अण्णा मेजर), शिवरे, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र सोनवणे, जगदीश पाटील, लोटन बडगुजर, सोपान महाले, योगेश पाटील, रऊफ पठाण, अनिल शिंदे, गजानन चव्हाण, रॉकी पवार, महेंद्र बागुल, शरद पाटील, योगेश पाटील, किरण देसले, दिनेश पाटील, शरद पाटील BEG, नरेश पाटील माजी सैनिकांनी श्रध्दाजंली अर्पण करुन शहीद जवान अमर रहे व भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.