पुणे (वृत्तसंस्था) ज्येष्ठ लेखक आणि ‘हिंदु’कार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये एका समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप आहे. अॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परखड विषयावर भाष्य करणारे आणि आपल्या लेखनीने समाजातील ज्वलंत विषयावर बोट ठेवणारे लेखक अशी नेमाडे यांची ओळख आहे. त्यांनी लिहलेल्या हिंदू या कादंबरीला साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मात्र आता त्याच पुस्तकात आक्षेपार्ह लिखान केल्याच्या आरोप करत नेमाडेंविरोधात पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यावर एका समाजाबाबत आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप तक्रारदार अॅड. रमेश राठोड यांनी केलाय. दाखल तक्रारीनुसार नेमाडेंविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा देश पाकिस्तान होत चालला आहे, असं परखड विधान केलं होतं. या आंदोलनाविषयी बोलताना “हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत,” असे नेमाड म्हमाले होते.
रमेश राठोड यांच्या तक्रारीनंतर भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात कलम ५००, ५०५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, भालचंद्र नेमाडे यांनी लमाण समाजाबद्दल पुरावे द्यावे नाहीतर पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणीही तक्रारदार रमेश राठोड यांनी केली आहे.