मावळ (वृत्तसंस्था) पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune Mumbai Express Highway) झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्धी कार ट्रकखाली गेली आहे. अपघातग्रस्त कार मुंबईवरून पुण्याकडे जात होती.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने ट्रकला धडक दिली. यामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा जागीच जीव गेला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या सहाय्याने कटरच्या मदतीने कारमधील मृतदेह बाहेर काढवे लागले. दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. विजय विश्वनाथ खैरे, रा. सातारा या एकाच मृताचा ओळख पटली आहे. दोघांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.