अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन केल होत. आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. शिरीषदादा हिरालाल चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता याच दिनाचे औचित्य साधत कोरोनाच्या महाभयंकर संकटात देखील सामाजिक बंधिकली जपत रक्तदानाचे महान कार्य केले.
समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने रक्तदान करून इतरांना मदत करण्याचा आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलं. तर यावेळी शिरीष दादा मित्र परिवाराने देखील रक्तदान करत माणुसकी धर्म निभावला. सुजीत पाटील जे सदैव रक्तदान करत असतात तर राकेश साळी, ऋत्विक भामरे, आबु महाजन व उदय खंडारे आदींनी रक्तदान केलंय. तर पुढे बोलताना आ. शिरीष चौधरी म्हणाले की, दर तिन महिन्यांनी रक्तदान केले पाहीजे. शरीराला फायदेच होतात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले. तर शहरातील रक्तदान चळवळ राबवणारे मनोज शिंगाणे यांच्या कार्याचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. परिस्थिती कितीही नाजुक असली तरी रक्ताची कमतरता भासणार नाही असे सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांनी यावेळी सांगितले.
कोरोनामुळे तालुक्याची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क सॕनिटायझर व शासन नियमांचे पालन करावे व कोरोनाला हद्दपार करावे, अस देखील शिंगाणे म्हणाले.