धरणगाव (प्रतिनिधी) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी नुकतेच तालुक्यातील कवठाळ येथील कालेश्वरी मोतेच्या चरणी नतमस्तक होत शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे.
सध्या नवरात्र सुरू असुन देशभरात भक्तीचा सागर उसळला आहे. मातेची पुजा-अर्चना करुन भाविक आपले मागणे मागत आहेत. अशात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी देखील धरणगाव तालुक्यातील कवठाळ येथील कालेश्वरी मोतेच्या चरणी नतमस्तक होत शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची भरभराट होवो. त्यांच्या आयुष्यात सुख नांदो, असे साकडे प्रतापराव पाटील यांनी घातले. या प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या मिलींद पाटील, माधव पाटील, डॉ. श्रीराम पाटील, नाटेश्वर पवार, सतीष पाटील, धनराज पाटील यांनी प्रतापराव पाटील यांचा सत्कार केला.