चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात काही दिवसापुर्वी अशोक देवराम पाटील या नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीसाठी आज आदिवासी संघटनांनी एकत्र येत चोपडा येथील विश्रामगृह येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.
तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे तेथे उपस्थित नसल्याने एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्ताञय नेतकर व पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना दिले. यावेळी ढवळे म्हणाले की, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे, असे म्हणत त्यांना धारेवर धरले. तसेच लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा नाही तर, यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल, असेही ढवळे म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष व इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यात आदिवासी विविध संघटना आदिवासी टायगर सेना,एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य,एकलव्य क्रांती संघटना,एकलव्य आदिवासी युवा संघटना,आदिवासी एकता परिषद,अखिल भारतीय एकलव्य संघटना,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,जय आदिवासी युवा शक्ती संघटना,भिल्ल समाज विकास मंच,शबरी माता बिल विकास संस्था,बहुजन समाज पार्टी,भारत राष्ट्र समिती,आदी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जन आक्रोश मोर्चाकरिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.