जळगाव (प्रतिनिधी) मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घालते होते. परंतु जिल्ह्यात आज तब्बल पाच महिन्यानंतर एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. तर दुसरीकडे जिल्ह्यात आज ९१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर – १२, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ- १६, अमळनेर-०९, चोपडा-०५, पाचोरा-०२, भडगाव-०४, धरणगाव-०५, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०८, रावेर-०३, पारोळा-०१, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-०३,बोदवड-०१ आणि अन्य जिल्हा ०२ असे एकुण ९१ रूग्ण आज आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकुण ५१ हजार ३०४ रूग्ण आढळून आले असून ४७ हजार ६२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. एकुण जिल्ह्यात १२३० रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे.