जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत. परंतू काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्वा बिलं वसूल केलेले आहेत. त्यामुळे शासकीय लेखा परिक्षण बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. त्यावर श्री. राऊत यांनी खाजगी रुग्णालयांचे ऑडीट सुरूच राहील, असे आश्वासन मालपुरे यांना दिले आहे.
गजानन मालपूरे यांनी दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हयात कोरोना रुग्णांची फार मोठी संख्या होती. त्यात अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेले आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्वा रक्कमा रुपालयाकडून वसुल केलेल्या आहेत. त्यासोबत हे ही तितकेच खरे आहे की, काही खाजगी राम्णालयांनी मोलाच सहकार्य केलेले आहे. परिस्थितीचे भान ठेवून कोरोना योद्धा म्हणून कार्य केले, त्याचा गौरव होतच आहे. त्याबरोबर ज्या डॉक्टरांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने अवास्तव व अवाजवी बिलं आकाररलेली आहेत. त्यावेळी शासनाचे लेखा परिक्षणामुळे अनेक राज्यांना फायदा होऊन काही रुग्णालयाकडून अवास्तव आकारलेली रक्कम देखील परत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीचे भान ठेवून, शासकीय लेखा परिक्षण सुरु राहणे गरजेचे. अजूनही शासकीय नियमानुसार अनेक डॉक्टर बीलं आकारत नाहीय. तशात शासकीय लेखा परिक्षण बंद झाले तर सर्व सामान्यांनी न्याय कोठे मागावा?, याबाबत संभ्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे शासकीय लेखा परिक्षण समिती कायम स्वरुपाची ठेवावी जेणे करुन रुग्णांना या हलाखीच्या परिस्थितीत मदत होईल व काही डॉक्टरांकडून बिलात व औषधीच्या रुपाने होणारी लुट थांबण्यास मदत होईल. त्यावर श्री. राऊत यांनी खाजगी रुग्णालयांचे ऑडीट सुरूच राहील, असे आश्वासन मालपुरे यांना दिले आहे.