जळगाव (प्रतिनिधी) भावासोबत पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात तरुण पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. रेल्वेतून प्रवास करत असतांना राहूल साहब सरोज (वय २३, रा. शिकरारा, अलिशाहपूर जौनपुर, उत्तर प्रदेश) हा तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोहाडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील शिखरारा गावात राहुल सरोज हा आपल्या कुटुंबीयसह वास्तव्याला होता. त्याचा मोठा भाऊ गोपाल हा पुण्यात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. दरम्यान कुटुंबाला आणि भावाला हातभार लावण्याकरीता राहुल हा देखील भावासोबत पहिल्यांदाच नोकरीच्या शोधार्थ रेल्वेने पुण्याला जाण्याकरीता दि. १७ जून रोजी ते उत्तरप्रदेश येथून रेल्वेने बसले. बुधवारी दि. १८ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असताना राहुलचा धावत्या रेल्वेतून तोल गेला आणि तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहाडी शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ४०९ ते ४१० दरम्यान घडली.
रेल्वेत भाऊ दिवत नसल्याने घेतला शोध
भावासोबत प्रवास करीत असलेला राहुल हा रेल्वेत दिसत नसल्याने त्याचा भाऊ गोपाळ याने रेल्वेत शोध घेतला. मात्र काही वेळानंतर त्याला भाऊ दिसत नसल्याने तो पुढील पुढच्या स्टेशनवर उतरला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे चौकर्शी ली असता, त्याला रेल्वेतून पडून तरुण ठार झाल्याचे समजले.
भावाचा मृतदेह दिसताच आक्रोश
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी गाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. दरम्यान, गोपाळ हा काही वेळानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला भावाचा मृतदेह दिसताच त्याने एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.