नवी दिल्ली (वृत्तसंस्था) झारखंडच्या पाकूरमध्ये LPG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक (Truck) आणि बसचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. या भीषण अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार विमल यांनी दिली. भरधाव बस आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणारी ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, मात्र सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही, तसं झालं असतं तर घटना आणखी गंभीर झाली असती.