पालघर (वृत्तसंस्था) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक जोरात धडक बसली. यामध्ये ३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जखमींना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री ३: ३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत ३ जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच जखमींना देखील उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.