लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात लहान मुलांसह १४ वऱ्हाडाची मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये १२ कुंडा कोतवालीच्या चौंसा जिरगापुर गावातील होती. ड्रायव्हर आणि एक नऊ वर्षांचा मुलगा दुसऱ्या गावाचे होते. ते नवाबगंज पोलिस स्टेशन परिसरात शेखपुरा गावात लग्नासाठी गेले होते. अपघात मानिकपूर स्टेशन परिसरात प्रयागराज हायवेवर झाला. पोलिसांचा अंदाज आहे की, ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा. अपघात एवढा भीषण होता की, जीपचे दरवाजे कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातात पारसनाथ (ड्राइव्हर, (४०), मिथिलेश कुमार (१७), बबलू (२२), अभिमन्यु (२८), रामसमुझ (४०), नान भैया (५५), दयाराम (४०), दिनेश (४०), पवन (१०), अमन (७), अंश (९), गौरव (१०), सचिन (१२), हिमांशु (१२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जोरदार धडकेचा आवाज ऐकून आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना फोन केला आणि बचाव कार्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे.