मुंबई (वृत्तसंस्था) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलचं वातावरण तापलं आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उडी घेतली आहे. अमृता फणवीस यांनी नाव न घेता एका ट्विट केलं आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असं ट्विट त्यांनी केलंय.
राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना परमबीर सिंह यांनी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधलाय. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?’ असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी #SachinWaze #Target100Cr असे हॅशटॅग देखील दिले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटींची मागणी केली. असा गंभीर आरोप माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे. परंतु आता अनिल देखमुख यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.