जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून महिलेच्या पती व नणंदेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १७ मार्च २०२२ रोजी २५ वर्षीय महिलेला त्यांच्या घरात कोणीतरी पाहत असल्याचा भास झाला असता महिलेचे पतीला तु इतक्या रात्री इथे काय करत आहेस? असे किसन काशिनाथ दांडगे म्हणाला. या कारणावरुन महिला व महिलेचा पतीला शिवीगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. तसेच किसन दांडगे याने महिलेचा यांचा हात पकडुन त्याचेकडे ओढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. तसेच काशिनाथ केशव दांडगे व एका महिलेने (नांद्रा हवेली ता. जामनेर) अशांनी महिलेचे पती व नणंद अशांना देखील शिवीगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुरनं ११६/२०२२ भादवी कलम ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४, ३४ प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.