मुंबई (वृत्तसंस्था) अँटिलिया प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेवर आता अभिनेत्री कंगना रनौतही मैदानात उतरली आहे. तिने वाझे यांच्यावर सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले की, ‘या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल.’
मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ पार्क करण्याच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका होत आहे. त्यातच आता अभिनेत्री कंगना रनौतनंही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कंगनाने पोस्ट केले – ‘माझे एक्स-रे येथे मोठ्या षडयंत्राचा तपास करु शकतात, शिवसेनेकडून सत्तेत आल्यानंतर त्यांना (वाझेंना) सस्पेंड करण्यात आले होते नंतर पुन्हा त्यांना परत आणले. जर योग्य प्रकारे तपास झाला तर केवळ लपलेले सांगाडेच बाहेर निघणार नाहीत, तर महाराष्ट्र सरकारही कोसळेलही,मी आणखी २०० एफआयआर दाखल करू शकते, जय हिंद. ‘
मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने शनिवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा आरोप केला. या आरोपासह इतर कलमान्वये वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात अटक करण्यात आलं होतं.