साकळी (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली गावाजवळ एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सुमारे 35 ते 40 ब्रास विनापरवाना वाळुची साठवण केल्याचे महसुल प्रशासनाने केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे.
या संदर्भात महसुल प्रशासनाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील कोरपावली गावाजवळ यावल शहराकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर असलेल्या कमलाकर तुकाराम नेहते यांच्या शेतात बेकायद्याशीररित्या सुमारे ३५ ते ४० ब्रास वाळु साठवन करून ठेवल्याचे आढळून आले. याबाबत कोरपावली विभागाचे मंडळ अधिकारी शेखर ए तडवी तथा कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे यांनी शेतात जावुन या बेकायद्याशीरपणे साठवण करून ठेवलेल्या वाळुचा पंचनामा केला असुन, तसा अहवाल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आले. वाळु साठवन करणाऱ्या शेतमालकावर शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावल परिसरात विविध ठीकाणी अशाच प्रकारे मोठया प्रमाणावर बेकायद्याशीररित्या उपसा करून आणलेली वाळुची साठवन काही वाळु माफीयाच्या वतीने करण्यात आलीअसल्याचे वृत्त असुन, शहरात चालणाऱ्या शासकीय किंवा खासगी बांधकामावर ही वाळु छुप्या मार्गाने वाढत्या किमतीत दिली जात असल्याचे कळते याकरीता महसुल प्रशासनाने रात्रीच्या वेळीस गस्ती वाढविल्यास या प्रकारास प्रतीबंध करता येईल.