धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे 1992-93ते2000-01 या वर्षातील इयत्ता 12 विज्ञान मधील बॅचचा स्नेहमिलन सोहळा दि.27 जानेवारी शनिवार रोजी पार पडला. यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजयभाऊ पगारिया, संचालिका नीनाताई पाटील, प्राचार्य डॉ.एस.बी. शिंगाणे, उपप्राचार्य प्रा.पंकज देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. आर.पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी. डी.पाटील होते. तब्बल तीस वर्षांनी कॉलेजमधील मित्रांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला होती. या स्नेहमेळाव्याचे आयोजन,नियोजन माजी विद्यार्थी संपर्क तीन ते चार महिन्यांपासून समन्वयक प्रा. डी. डी.पाटील व प्रा. ए. आर.पाटील यांच्या मार्गदरशनाखाली डोळ्याचे पारणे फेडणारा सुदंर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. डी.पाटील यांनी मांडले. तर उद्घाटन सेवा निवृत्त प्रयोगशाळा परिचर मनोहर महाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्याना बॅच वर्षाप्रमाणे उपस्थित मान्यवर, प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांच्या शुभहस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी विशाल मकवाने,दीपक जैन, ज्ञानेश पाटील,सईद शाह,तुकाराम विसावे,रेखा पाटील,सचिन भावसार,उदय सोनवणे,अमोल दीक्षित,पराग कुलकर्णी, उल्हास जाधव, युवराज पाटील, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करुन व जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जीवनातील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देताना गहिवरून आले. प्रा. ए.आर.पाटील, प्रा.आर.आर.पाटील, श्रीमती प्रा.आर.पी.चौधरी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
दुपार सत्रात गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना अभिवादन करून सवाद्य वाजत गाजत मिरवणूक विद्यार्थ्यांच्या आठवणीतील जुनी विज्ञान कॉलेज पी.आर.हायस्कूलपर्यंत काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील आनंद ताल,ठेका घेऊन व्यक्त केला.
अध्यक्ष भाषणात डॉ.अरुण कुलकर्णी यांनी सांगितले की, जीवनात कितीही मोठ्या पदावर असू द्या. परंतू सुख दुःखात आपले मित्र,मैत्रीण यांना कधीही विसरू नका. मैत्रीचे नाते जोपासत सुख दुःखाला मदतीला धाऊन एकमेकाला आधार द्यावा, असे डॉ.मिलिंद डहाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.जे.पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर. ए.पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले.