नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २८ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये २८,५९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३३८ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. ३४,८४८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. देशात सध्या करोनाचे तीन लाख ८४ हजार ९२१ सक्रिय रुग्ण आहेत, तर तीन कोटी २४ लाख ९ हजार ३४५ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ७३,८२,०७,३७८ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात ७२,८६,८८३ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
केरळमध्ये शनिवारी २०,४८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आणखी १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, केरळमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ४३ लाख ५५ हजार १९१ झाली आहे. तर २२,८४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.