नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ५ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४०३ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांमध्येही देशात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. देशातील एकूण बाधितांची एकूण संख्या ३,२४,२४,२३४ झाली आहे. आजपर्यंत देशात ३,१६,३६,४६९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३,५३,३९८ असून, आजपर्यंत देशात ४,३४,३६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
देशात आजपर्यंत ५८,१४,८९,३७७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी मागील ५२,२३,६१२ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट पर्यंत देशात ५०,६२,५६,२३९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी १५,८५,६८१ नमुन्यांची काल तपासणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आलेली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ५७५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख २७ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के आहे. राज्यात शनिवारी १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.