नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३७ हजार ६८१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ९७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३७ हजार ६८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, शुक्रवारच्या (९ सप्टेंबर) तुलनेत नव्या कोरोना रुग्णसंख्येत ७.७ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सद्यस्थितीत एकूण ३ लाख ९० हजार ६४६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर देशातील आतापर्यंतची एकूण करोना रुग्णसंख्या ही ३ कोटी ३१ लाख ७४ हजार ९५४ वर पोहोचली आहे. त्याचसोबत, कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ३ कोटी २३ लाख ४२ हजार २९९ इतका आहे. तर, देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९७.४९ टक्के इतका आहे.
कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरणाबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ६७ लाख ५८ हजार ४९१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ७२ कोटी ३७ लाख ८४ हजार ५८६ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात गुरुवारी ४,२१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तसेच ५५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी २ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९५ हजार २३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतकं आहे.