नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात कायम असून गेल्या २४ तासांत ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन कोटी १३ लाख १७ हजार ९०१ झाली आहे. तसेच ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन कोटी १३ लाख १७ हजार ९०१ झाली आहे. तसेच ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख २० हजार ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या २४ तासांत ३९,९७२ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या तीन कोटी ५ लाख ४३ हजार १३८ वर पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ८ हजार २१२ वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल (शनिवारी) ६,२६९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार ३३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख २९ हजार ८१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५टक्के आहे. राज्यात काल २२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के झाला आहे.