नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशातील प्रभाव काहीसा कमी झाला आहे. पण देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ५० हजार ६६७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१,६६७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.३० टक्के आहे, तर रिकवरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय प्रकरणे सुमारे २ टक्के आहेत. कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्या क्रमांकावर आहे. जगात अमेरीका, ब्राझीलनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
आतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.