फैजपूर (प्रतिनिधी) विट भट्टीच्या धुरामुळे संपूर्ण फैजपूर शहरात वाढत्या प्रदूषणाने लक्कडपेठ, इस्लामपुरा, मिलतनगर, झोपडपट्टी रहिवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात मिल्लत नगर मधील लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासनाने या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे.
शहरात धाडी नदीत उत्तर- दक्षिण दिशेने आठवडे बाजार पर्यंत गेल्या काही वर्षांपासून विट भट्टी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहे. पश्चिमेकडे धाडी नदीच्या काठावर जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा सुरू आहे. पूर्वेकडील बाजूस बहिणाबाई चौधरी मराठी शाळा व हायस्कुल, फातेमा उर्दू गर्ल हायस्कुलच्या सर्व मुला-मुली या विद्यार्थ्यांचा सतत वापर आहे. वीट भट्टीचे धुरामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान तसेच अनेकांना श्वसनाचे विकाराला सामोरे जावे लागत आहे. या नदीमध्ये वीटभट्टी लावण्यासाठी नगरपालिके कडून मान्यता आहे का ? शासनाने यांना परवानगी दिली आहे का ? व पर्यावरण विभाग कडून परवानगी मिळाली आहे का ? असा प्रश्न शहरातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग समाजसेवक/नागरिकांना आहे. फैजपूर परिसरात मिल्लत नगर मधील लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासनाने या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे. अशी मागणी फैजपूर येथील एम मुसा जन विकास सोसायटी असंघटित गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक व सर्व सदस्य कामगार तसेच मिलतनगर, इस्लामपुरा झोपडपट्टी येथील नागरिक या अर्जाद्वारे उपविभाग्य अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद फैजपूर यांचेकडे निवेदन देऊन तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या विट भट्टी विरोधात स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही कामगार संघटना दि. १० फेब्रुवारी २०२१ नंतर कायद्याचे पालन करून मोर्चा काढून उपविभागीय कार्यालय समोर उपोषण करणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी दिली.