जळगाव प्रतिनिधी । कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकातून सहयोगी प्राध्यापक नियुक्ती केलेल्या प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर सचीव तथा ॲडव्होकेट कुणाल पवार यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सहाय्यक प्राध्यापका तुन सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नती करिता युजीसी व महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या नुसार – विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष सदर संस्थेचे अध्यक्ष किवा संस्थेने नाम निर्देशीत केलेले संस्थेचे पदाधीकारी हे असतात परंतु जेडी एम व्ही.पी महाविद्यालयात आज दि. १ ऑक्टोबर २० रोजी झाले त्या निवड समितीत महाविद्याल्यामध्ये एका पेक्षा जास्त व्यवस्थापनाचे वाद सुरु असताना विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु ने एका गटाने केलेल्या मागणीनुसार निवड समिती दिली. हा इतर गटांवर अन्याय असुन सदरची बाब न्याय प्रविष्ठ असताना देखील विद्यापिठाने निवड समिती देणे हे कसे काय झाले. यावरून असे दिसुन येते की प्र.कुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा एखाद्या अमिषा पोटी काम करत आहेत असे वाटते. ह्यात कमी अजून की एका तालुक्यात वेगळा न्याय दिला जातो. तिथ कमिटी दिली जात नाही फक्त जळगाव मधील एका संस्थेला का हे सर्व दिल जाते. करण स्वतः कुलगुरू निर्णय देताना वेगळा देतात जो सन 2017 मधे दिला आहे आणि आता काय एवढा मोठा फरक जाला की प्र कुलगुरू एकूण हे कुलगुरू साहेब यांचा आदेश न जुमानता काम करत आहे म्हणून आम्ही सदर बाबींचा निषेध करतो व मा. कुलगुरु यांच्याकडून अपेक्षा आहे की या बाबींची चौकशी करून योग्य तो न्याय मिळवुन द्यावा ह्याच खर असणारे स्पष्टीकरण प्र कुलगुरू ह्यानी देण्याच प्रामाणिक काम करावे एवढीच विध्यार्थी व त्यांच्या पालकांची अपेक्षा आहे. असे मागणी निवेदनात म्हटले आहे.