जळगाव (प्रतिनिधी) शहरात टॉवर चौक, मनपा चे सतरा मजली इमारत समोर, नेहरु चौकातील नेहरु पुतळ्या समोर व कोर्ट चौकत व शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी तसचे जळगाव शहरात मनपा हद्दीमध्ये अवैधरित्या बॅनर/झेंडे लावुन शिवसेनेनं शहराचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ?
सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज दि. २७ मे २०२२ रोजी ११.३० वाजेचे दरम्यान मी मनपा जळगाव यांचे सतरा मजली इमारती समोरुन जात असतांना दोन दुचाकी स्वारांची दुभाजकावर लावलेल्या अवैध बॅनरमुळे किरकोळ अपघात झाला. व त्यांच्यात आपसात भांडण झाले. त्याच्या भांडणाचे चित्रीकरण झी 24 तास या वृत्तवाहिनीने केले असून सदर अपघात झालेले भांडण करते हे तक्रार न देता सदर ठिकाणा वरुन निघुन गेले. मी एक सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने सदर बॅनर बाबत जळगाव मनपा येथे जावुन तपास करता सदर बॅनर लावणारे यांचेकडेस काही बॅनर लावण्याची परवानगी जळगाव मनपा यांनी दिलेली आहे. परंतु, त्यांचेकडे पोलीस विभागाकडील परवानगी नाही तसेच त्यांनी मनपाकडुन बॅनरीची परवानगी देतांना २० नियम व अटी शर्ती घालुन देण्यात आलेले आहे. त्या २० पैकी क्रं. ०१ वर संबंधित स्थानिक पोस्टे व शहर वाहतुक नियंत्रण शाखेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ते त्यांनी घेतलेली नाही तसेच २० पैकी क्रं. ०४ वर फलकावर मनपाची पावती क्रं. व दिनांक तसेच मुदतीचे दि. पासुन पर्यंत नमुद करणे बंधनकारक आहे. परंतु, मनपा गेट समोर रोडावरील दुभाजकवर लावलेले बॅनरमध्ये त्यांनी ते नमुद केलेले नाही. तसेच २० पैकी अट क्रं. ११ वर महापुरुषांचे स्मारकाजवळ जाहिरात फलक/होल्डींग/कापडी फलक/झेंडे/पोस्टर्स लावता येणार नाहीत. वस्तुस्थिती पाहता पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे पुतळ्याजवळ शिवसंपर्क अभियानाचे झेंडे व पुतळयाजवळ बॅनर लावलेले आहेत. जे अटी क्रं. ११ चे उल्लघंन आहे. तसेच २० पैकी अटी क्रं. १५ वर असे नमुद आहे की, रस्त्याचे दुभाजकामध्ये जाहिरात फलक (होल्डींग) कापड फलक/झेंडे/पोस्टर्स लावता येणार नाही. परंतु, मनपा सतरा मजली ईमारत समोर रोडवर दुभाजक व शहरातील अनेक दुभाजकवर शिवसंपर्क अभियानाचे बॅनर व झेंडे लावण्यात आले आहे. जे अटी क्रं २० पैकी १५ चे उल्लघंन आहे.
माझ्या शहरातील सौंदर्यकरण हितासाठी मी अनेकदा जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधिक्षक, तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांचे कडे अवैध बॅनर/होल्डींग यांची तक्रार केलेली होती. त्याची दखल घेवुन तिन्ही वरिष्ठ अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी १ ऑक्टोंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेवुन सांगितले होते की, यापुढे २ ऑक्टोबर २०२१ पासुन महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगाव शहरात स्वच्छता अभियान राबवुन यापुढे जे कोणी अवैध बॅनर/होल्डींग लावेल त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व जनतेला आव्हान केले होते की, यापुढे कोणीही अवैध बॅनर लावणार नाही यापुढे जो कोणी व्यक्ती, संस्था, पार्टी, पक्ष बेकायदेशी बॅनर लावेल त्यांचे विरुध्द दंडात्मक व फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील. परंतु, शिवसंपर्क अभियान राबवतांना अवैध बॅनर लावणारे शिवसेना पार्टी जळगावचे संबंधित पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे व तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी या तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांची दिलेली सुचना/आव्हान यांचे पालन केले नाही व शहरात अनेक ठिकाणी मनपा कडील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे लवलेले बॅनर हे बेकायदेशीर ठरता. त्यामुळे जनहितार्थ माझी संबंधित अवैध बॅनर लावणारे शिवसेना पार्टीचे संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जळगाव शहरात टॉवर चौक, मनपाचे सतरा मजली इमारत समोर, नेहरु चौकातील नेहरु पुतळ्यासमोर व कोर्ट चौकत व शहर पोलीस स्टेशन यांचे हद्देत अनेक ठिकाणी तसचे जळगाव शहरात मनपा चे हद्दीमध्ये अवैधरित्या बॅनर/झेंडे लावुन शहराचे विकृतीकरण केले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द तसेच आज रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी असतांना नेहरुजींच्या पुष्पहार घालतेवेळी पुतळयाजवळ शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाचे झेंडे लागलेले होते. त्या जागी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी झेंडे काढण्याची सुचना न देता नेहरुजींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला असून त्यांनी सदर महापुरुषाच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे. त्यामुळे माझी त्यांचे विरुध्द पण जनहितार्थ कायदेशी तक्रार असुन वरील बॅनर/होल्डींग लावल्यामुळे किरकोळ अपघाताप्रमाणे भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. करीता असा अपघात होणार नाही या उद्देशाने महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम १९९५ चे कलम ३ व ७ अन्वये तसेच अन्य प्रचलित कायद्यानुसार माझी कायदेशीर तक्रार असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.