जळगाव (प्रतिनिधी) ओवाळीच्या कार्यक्रम आटोपून भुसावळ जाण्यासाठी बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत नणंद-भावजाईच्या पर्समधून चोरट्यांनी ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अजिंठा चौफुली परिसरात घडली. याप्रकरणी बुधवार दि. २४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्याकडे ओवाळीचा कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर बोरसे यांनी त्यांच्यासह नणंद यांनी घातलेले दागिने आपापल्या पर्समध्ये ठेवले आणि त्यानंतर ते भुसावळ येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली येथे आल्या. चार वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची (एमएच २०, बीएल ३५५३) क्रमांकाची ठाणे ते मुक्ताईनगर बस त्याठिकाणी आली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची हातसफाई बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मेठ्या प्रमाणात गर्दी होती. बोरसे बसमध्ये चढल्यानंतर बस काही अंतरापर्यंत केल्यानंतर त्यांनी पर्स पाहिली असता, त्यांना पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. तसेच त्यामध्ये ठेवलेले दागिने हे दिसून न आल्याने किरण बोरसे यांनी त्यांच्या नणंदला देखील पर्समधील दागिने पहण्यास सांगितले. मात्र त्यांच्या पर्समधील देखील दागिने दिसून आले नाहीत.
९० ग्रॅम वजनाचे दागिने केले लंपास !
चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असतांना दोघांच्या पर्समधून ३ तोळे सोन्याची पट्टा पोत, ३ तोळ्याचा नेकलेस आणि तीन तोळ्याचा मनिषा सहावे यांची पट्टा पोत असा ए एकूण ९० ग्रॅम वजनाचा सुमारे ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी किरण बोरसे यांनी बुधवार दि. २४ एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.