जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच जळगाव जिल्ह्याने पक्षाला असंख्य कार्यकर्ते दिले. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कल्पक आंदोलनांमुळे पक्षाचा मतदार निर्माण झाला, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाने उत्तम कामगिरी बजावली. आता यापुढे एकदिलाने काम करून जळगाव हा मनसेचा बालेकिल्ला बनवायचा आहे” असा निर्धार मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, जळगाव महापालिका निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे पक्षाचे उपाध्यक्ष विनय भोईटे यांची पुन्हा एकदा जळगाव ‘निरीक्षक’पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या पार्शवभूमीवर विनय भोईटे, कीर्तिकुमार शिंदे, अजिंक्य चोपडे यांनी शहरातील ‘कोझी कॉटेज’ येथे दिवसभर पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि शहर तसंच जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. जळगाव शहर व ग्रामीण, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भुसावळ, रावेर, चोपडा, एरंडोल येथील सुमारे ३००हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे व भोईटे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील राजकीय अडचणींचा पाढा वाचला. इतर राजकीय पक्षातील काही विद्यमान तसंच माजी नगरसेवकांनीही शिंदे आणि भोईटे यांची भेट घेतली.
“२०१३ महापालिका निवडणूक आणि २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम फोडला होता. आता पुन्हा एकदा आपल्याला त्याच जोमाने आणि उत्साहाने काम करायचे आहे” असं मत उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी व्यक्त केलं.
पक्षाच्या बैठकीला जिल्हा सचिव ऍड जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाघ, विरेश पाटील, विनोद शिंदे, चेतन आढळकर, विनोद पाठक, संजय नंनवरे, आशिष सपकाळे, राहुल काळे, डॉ उमेश सपकाळे, संदीप मांडोळे, अविनाश पाटील, रंजाक सय्यद, किरण तळेले, योगेश पाटील, निलेश बारी, विशाल सोनार, संदीप चौधरी, मतींन पटेल आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.