चाळीसगाव (प्रतिनिधी) दरवर्षी कारगिल विजयदिनी लष्करातील जवानांचा सन्मान करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून गड-किल्ले संवर्धनातील त्यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी बहुमूल्य असल्याचे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आयोजित ‘शौर्य तुला वंदितो’ या कार्यक्रमात चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. विनोद कोतकर यांनी केले.
कारगिल विजय दिनाचे निमित्त साधून सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रभर ‘शौर्य तुला वंदितो’ या नावाखाली लष्करातील जवानांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या माध्यमातून आज येथील शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याच वेळी सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांनी गड-किल्ले संवर्धना बरोबरच समाजातील विविध घटकांना उपयुक्त ठरणारे कार्य करणारी सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था जवानांच्या प्रति अत्यंत आदर बाळगून त्यांना मानाचे स्थान देते, याबद्दल अभिमान वाटतो असे सांगितले.
यांचा झाला सन्मान !
आजच्या कारगिल विजयदिनी लष्करातील जवान धोंडू पवार, अरुण पाटील, सुनील राठोड, राजेंद्र शार्दुल, राम शिंदे, यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रतिष्ठानच्या मार्फत सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य दिगंबर शिर्के यांच्या सेवापूर्ती बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम चव्हाण, विवेक रणदिवे, संदीप वराडे, संभाजी पाटील, अरुण अजबे, विनोद शिंपी, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुशिंग, योगेश शेळके, जितेंद्र वाघ, सचिन पाटील, मोहन भोळे, पप्पू पाटील, दीपक दाभाडे, अजय घोरपडे, गणेश देवरे, सागर आगोने, संजय पवार, सतीश पवार ,यश पवार, गणेश गवळी, चेतना भागवत, कोमल भागवत, नुतेश भागवत आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी केले. तर सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी व आभार जितेंद्र वरखेडे यांनी मानले.