नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यातच देशासाठी समाधानकारक माहिती समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत ५०,१२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजवर तब्बल ७० लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. देशासाठी ही मोठी समाधानकारक बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात एकूण करोनाबाधितांची संख्या ७८,६४,८११ वर पोहोचली असून यांपैकी ६,६८,१५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ७०,७८,१२३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत ६२,०७७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच १,४०,७०२ वर पोहोचली आहे. भारतात आजवर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १,१८,५३४ इतकी असून ५७८ नव्या रुग्णांचा चोवीस तासांत मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण १,४०,७०२ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी महाराष्ट्र अद्यापही रुग्णांची संख्या कायम आहे. आजवर महाराष्ट्रात १४,५५,१०७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर यांपैकी ४३,१५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.