कोलकाता (वृत्तसंस्था) बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले,” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारवर टीकास्त्र डागलं.
विधानसभा निवडणुकीची घोषणा पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘गेल्या दशकांमद्ये ब्रिगेड ग्राउंडमध्ये अनेक वेळा नारा देण्यात आला आहे की, ब्रिगेड चलो. या ग्राउंडने अनेक देशभक्त पाहिले आहेत. हे ग्राउंड बंगालच्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्यांचाही साक्षीदार आहे. बंगालच्या भूमीला २४ तास उपोषण आणि आंदोलनांमध्ये ठेवणाऱ्यांची धोरणे व षड्यंत्रही या ग्राउंडने पाहिले आहेत’. पुढे मोदी म्हणाले की, ‘या लोकांनी बंगालच्या महान भूमीची जी अवस्था केली आहे, ती पिढ्यान पिढ्या बंगालच्या लोकांनी सहन केली आहे. ही बंगालच्या लोकांची महानता आहे, इच्छाशक्ती आहे की, त्यांनी बंगालमध्ये विकासाची आशा अजुन सोडलेली नाही. विकासासाठी ममता दीदींवर त्यांनी विश्वास ठेवला होता, मात्र दीदींनी जनतेचा विश्वासघात केला आहे, जनतेच्या स्वप्नांना मोडले आहे.’
बंगालच्या मातीने भारताचा गौरव वाढवला आहे : मोदी
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘बंगालच्या या धरतीने आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राण फुंकले आहेत, ऊर्जा दिली, ज्ञान-विज्ञानमध्ये भारताचा गौरव वाढवला आहे. बंगालमधून निघालेल्या महान व्यक्तींनी एक भारताची भावना सशक्त केली आहे. या धरीने एक विधान, एक निशाण, एक प्रधानसाठी बलिदान देणारे पुत्र दिले आहेत. या धरतीला मी अनेकदा नमन करतो. माझे भाग्य आहे की, आज मला या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंडवर पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. या ग्राउंडच्या आजुबाजूला स्वामी विवेकानंदजी, सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे जन्मस्थळ आहे.’
“या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही,” असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.