जळगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून खरी समाजसेवा आणि देश सेवा करीत समाज आणि देश घडवलेला आहे. माणसांना घडवत त्या माणसाच्या जीवनाच्या आणि जगण्याच्या दिशा शिक्षणाच्या माध्यमातून घडवत धर्मनिरपेक्ष भारत घडवला त्या महामानवांची कृती त्यांनी केलेल्या सुधारणा कवितातून येणे म्हणजेच पिढ्यांना महापुरुषांकडे नेणे होय असे विचार ज्येष्ठ कायदेतज्ञ माजी कायदामंत्री गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद जळगाव, महात्मा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन प्रसंगी व्यक्त केले.
कवी संमेलनाचं उद्घाटन करताना ते म्हणाले की, जगणं आणि वास्तवता या कवितातून मांडतांना समाज समाजातली माणसं समाजातील दुःख, समाजातील दारिद्रय त्याचबरोबर समाजाला दिशा दाखवणार साहित्यही आलं पाहिजे ते साहित्य चिरकाल टिकणारं असतं असंही त्यांनी याप्रसंगी बोलताना मांडले.
कवी संमेलनाचे मुख्य अतिथी राज्याचे उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी मनोगतात महापुरुषांच्या विचारांची चेतना निर्माण करणारी कविता येण्याबरोबरच विषमतेचे साठीचा संघर्ष देखील कवितेत आणि त्यासोबतच चळवळीच प्रतिबिंब उमटवणारी कविता नव्या पिढीला दिशा देणारी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
कवी संमेलनाचे अध्यक्ष राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी क्रांती पर्वाच कविसंमेलन संबोधत परिवर्तन वादाचा एल्गार सामाजिक परिवर्तनाची कविता या कविसंमेलनातून मांडली गेल्याचे म्हटले.
कार्यक्रमास उदगीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार मस्के, नगरसेवक सचिन पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरुवातीस डॉ. मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले कविसंमेलनात प्रा. डॉ. मंगेश बनसोड( मुंबई) प्रा. डॉ. यशवंत राऊत (धारवाड), शेषराव धांडे (वाशिम), योगिनी राऊळ (मुंबई ),सुरेश साबळे (बुलढाणा), प्रा. डॉ. सारिपुत्त तुपेरे (सोलापूर), प्रा. डॉ. सत्यजित साळवे (जळगाव ), प्रा. डॉ. भास्कर पाटील (अकोला), प्रा. डॉ. अशोक इंगळे (अकोला), रमेश पवार (अमळनेर), विलास मोरे (एरंडोल) भारत गायकवाड (उदगीर) प्रा. बी. एन. चौधरी (धरणगाव), प्रा. डॉ. सतीश म्हस्के (पिंपळनेर), अर्जुन व्हटकर (सोलापूर), राजेंद्र पारे(चोपडा), महेंद्र गायकवाड (नागपूर), प्रा. डॉ. सुनील भडांगे (पालघर), प्रा. डॉ. रुपेश कराडे (यवतमाळ), प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर (जळगाव), राहुल निकम (जळगाव), प्रा. डॉ. रवींद्र मुरमाडे (चंद्रपूर), दिनेश चव्हाण (चाळीसगाव), संजय घाडगे (लातूर), प्रा.डॉ. संजय कांबळे (बेळगाव) इत्यादी मान्यवर कवींनी सहभाग घेतला. आभार सुरेश साबळे यांनी मानले. ऑनलाइन कविसंमेलनात राज्यभरातून श्रोत्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद लाभला.